RTE Admission Age Limit 2024 : भारत सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाकडून शाळेतील प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यासंदर्भात एक महत्वाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, त्यानुसार नवीन शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ च्या नवीन प्रवेशित इयत्ता १ लीसाठी किमान मुलांचे वय किती असावे? याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे, हा निर्णय देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी हे लागू करण्यात आला आहे.
$ads={1}
पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; केंद्र सरकारचे आदेश
नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, केंद्र सरकारने शाळेतील (School Admission Age Criteria) प्रवेश प्रक्रियेसाठी बालकाचे वय निश्चित केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 आणि बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE Act 2009) कायद्यातील तरतुदीनुसार बालकांच्या प्रवेशाचे वय निश्चित करण्यासाठी केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे.
त्यानुसार आता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुढील शैक्षणिक वर्षातील 2024-25 सत्रापासून ग्रेड 1 म्हणजेच इयत्ता १ ली मध्ये प्रवेशाचे वय 6+ वर्षे पूर्ण असल्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे.
आता इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकांचे वय 6 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठी चा मूलभूत टप्पा आहे. त्यामुळे आता इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संरचना | New Education Policy 2020 5+3+3+4
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या १०+२+३ या रचनेमध्ये बदल करून ५+३+३+४ याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यच्या शिक्षणाचा समावेश केला आहे.
केंद्र सरकारने मागील वर्षी घेतलेल्या निर्णयानुसार देशातील विविध राज्यात खालीलप्रमाणे भिन्नता दिसून आली होती.
- गुजरात, तेलंगणा, लडाख, आसाम आणि पुद्दुचेरी ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे पाच वर्षांच्या मुलांनाही पहिल्या वर्गामध्ये प्रवेश दिला जात होता.
- राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये पहिली इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय 5 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक होते.
- याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयाने लोकसभेत एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार, विविध राज्यांतील प्रवेश प्रक्रिया ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नसल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमधील प्रवेशाचे नियम वेगवेगळे असल्याचं समोर आले होते.
- त्यानुसार आता इयत्ता पहिलीमध्ये बालकाचा प्रवेश घेण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील बालकाचे किमान वय 6 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.